कृषी प्रदर्शनाचा फार्स करण्याऐवजी बागल गटाच्या नेत्यांनी आत्मपरिक्षण करून शेतकरी व कामगारांची देणी देऊन त्यांना दिलासा द्यायला हवा होता.

कृषी प्रदर्शनाचा फार्स करण्याऐवजी बागल गटाच्या नेत्यांनी आत्मपरिक्षण करून शेतकरी व कामगारांची देणी देऊन त्यांना दिलासा द्यायला हवा होता....... *युवा नेते शंभूराजे जगताप यांनी ऊस उत्पादक शेतकरी , ऊस वाहतुकदार व कारखान्याचे कामगार यांच्या देण्या बद्दलची प्रसार माध्यमांमध्ये मांडलेली वस्तूस्थिती बागल गटाच्या नेत्यांनी टिका समजू नये* - वनराज घोलप , अध्यक्ष ,किंग्ज फाऊंडेशन , करमाळा                                 

करमाळा तालुक्यातील आदिनाथ व मकाई कारखान्याच्या माध्यमातून स्वतः च्या कुटुंबाची प्रगती करून घेतलेल्या बागल गटाच्या नेत्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कळवळ्याच्या नावाखाली स्व . दिगंबर बागल मामा यांच्या जंयती निमीत्त दि . ९ मार्च पासून २- ३ दिवस कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे . आदिनाथ - मकाई च्या कामगारांच्या रखडलेल्या पगारीमुळे कित्येक कामगारांची कुटुंबे उध्वस्त झाली आहेत . काही कामगारांनी आत्महत्या केल्यामुळे , आर्थिक चणचणी च्या तणावाखाली जगत असताना काहींना हर्ट अटॅक येऊन जीव गमवावे लागले आहेत त्यामूळे कित्येक महिला विधवा झाल्या आहेत . त्यांना रोजीरोटी साठी मोल - मजूरी करावी लागत आहे . त्यांच्या मुलाबाळांची परवड झाली आहे . ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर बागल गटाच्या नेत्यांनी इस्टेटी कमावल्या त्यांच्या घामाचा दाम तात्काळ देण्याऐवजी तालुक्यातील जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी कृषी प्रदर्षनाचा  आव आणला आहे . मकाईचे चेअरमन दिग्वीजय बागल यांनी १५ एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांचे ऊस बील देवू असे आश्वासन दिले आहे . ऊस उत्पादक शेतकरी , कारखान्याचे कामगार व वाहतूकदारांच्या थकीत बिलांबाबत असेच आश्वासन २०१९ च्या विधानसभा निवडणूकीच्या वेळी  गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल यांनी दिली होते पण त्याची पूर्तता तर त्यांनी केलीच नाही ऊलट शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता कारखाना साईटवर बीला बाबत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह विचारणा करायला गेला असता मकाईचे चेअरमन दिग्वीजय बागल यांनी त्या हक्काचे पैसे मागायला गेलेल्या शेतकरी पुत्रास चेअरमन पदास न शोभणारी मारहाण व दमबाजी  केली . व त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला . निष्ठा वेशीला टांगून स्वार्थ - सोयिस्कर व फसवा - फसवी ची राजकिय वाटचाल आज पर्यंत या बागल गटाने केली आहे .यात मग  गटाचे   किंग मेकर व जवळचे नातेवाईक काकांना सुध्दा बागल कुटूंबियांनी सोडले नाही. त्यांच्या सोबत पेट्रोल पंपाच्या वाटणी वरून वाद केला . गावा - गावात कारखान्याच्या कामगारांना हाताशी धरून ऊस नोंदी पासून ऊस तुटे पर्यंत खालच्या पातळी वरचे राजकारण करून सहकारी साखर कारखाने असताना खासगी पॉपर्टी समजून शेतकऱ्यांची पिळवणूक केली आहे.खरं तर नुकतेच शेतकरी ,कामगार व वाहतुकदारांच्या मागील देण्यांबाबत जगताप गटाचे युवा  नेते शंभूराजे जगताप यांनी प्रसारमाध्यमांमधून आवाज उठवला व वस्तूस्थिती मांडली तर तो जिव्हारी लागून घेवून  बागल गटाचे नेते त्याला टिका म्हणत आहेत. शेतकऱ्यांच्या  थकित बीला बाबत उपाय योजना करण्या ऐवजी  कृषी प्रदर्शनात गर्दी करण्यासाठी पाळणे - झोपाळे निमंत्रीत केले आहेत . प्रदर्शनात स्टॉल्स च्या नावाखाली फक्त  पैसा कमावण्यासाठी प्रदर्शन भरवले आहे काय ? असे सामान्य नागरिकांना वाटत आहे . मी एक छोटा सामाजिक कार्यकर्ता आहे . बागल गटाच्या नेत्यांबाबत तालुक्यातील नागरिकांत एकप्रकारची चीड जाणवत आहे . वास्तविक पाहता या नेत्यांनी आत्मपरिक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे .

Comments

Popular posts from this blog

बहुजन विकास संस्थेच्या वतीने येत्या 7 ऑक्टोबर रोजी लेझर खतना कॅम्पचे आयोजन मुस्लिम बांधवांनी लाभ घेण्याचे केले आवाहन.

विकास कामे ,जनतेचा ठाम विश्वास व पाठबळामुळे नगरपालिका निवड्णुकीत जगताप गटाचा विजय निश्चित : माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे :- करमाळा( प्रतिनिधी राजु सय्यद )करमाळा शहरात गेली २५ वर्षापासून सातत्त्याने अखंडीत, सुरळीत सुरु असलेला पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य यासह कोट्यावधी रुपयांची केलेली विकासकामे शहरवासियांचा माजी आमदार जगताप यांचे नेत्तृत्वावर असलेला गाढा विश्वास, श्रद्धा व नागरीकांना दिलेल्या सोयीसुविधांमुळे येणाऱ्या नगरपरीषद निवडणुकीत जगताप गटाचा विजय निश्चित असल्याचा ठाम आत्मविश्वास माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी व्यक्त केला आहे . याविषयी अधिक माहिती देताना ढाळे यांनी सांगीतले कि,करमाळा नगर परीषद १९९५ सालापासुन मा .आ .जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली जगताप गटाच्या सलग २५ वर्ष ताब्यात आहे .' क' वर्ग नगर परीषद असताना देखील जयवंतराव जगताप यांनी अपक्ष आमदार असताना खास बाब म्हणून उजनी जलाशयावरून दहिगाव येथुन करमाळा शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर करून ती कार्यान्वित केली .२००९ मधे शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार याचा विचार करून १३ कोटीची विस्तारीत पाणी पुरवठा योजना देखील मंजूर करून कार्यान्वित केली . याचा परिणाम म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना , लातूरला रेल्वे व्दारे पाणीपुरवठा होत असताना , सोलापूर व अक्कलकोट सारख्या ठिकाणी १५ - १५ दिवस पाणी येत नव्हते परंतु करमाळा शहरात मात्र अखंडीत , स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा अव्याहतपणे सुरू होता व आहे . त्याचबरोबर शहरातील रस्ते, वीज, आरोग्य, स्वच्छता या बाबी अतिशय सुरळीत असल्यामुळे शहरवासियांची जयवंतरावांच्या नेतृत्वावर अगाढ श्रध्दा व ठाम विश्वास आहे .आगामी काळात शहरात भुयारी गटार योजनेस मंजुरी व निधीची उपलब्धता करून लवकरात लवकर ही योजना पूर्णत्वास नेण्याचा जयवंतराव जगताप यांचा मानस आहे . आमदार संजयमामा शिंदे यांचेसमवेत भुयारी गटार योजना व रस्ते निधी संदर्भात चर्चा होवून त्याचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच या योजनांना मंजूरी व निधीची उपलब्धता निश्चितपणे होणार असल्याची माहिती देखील आमदार शिंदे व माजी आमदार जगताप यांनी दिली आहे .जगताप गटाला करमाळा तालुक्यात कार्यकर्ते व नेते घडविणारी नर्सरी असे संबोधले जाते .जयवंतराव जगताप यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही . बहुसंख्य समाजासह अल्पसंख्य समाजासही त्यांनी राजकारणात न्याय दिला .करमाळा नगर परीषदेच्या नगराध्यक्षपदी त्यांनी युसूफ नालबंद, ॲड .डी.पी. जगताप, सुशीला आगलावे, शौकत नालबंद, सुनीता  वाशिंबेकर, विद्या चिवटे, पुष्पा फंड, अमोद संचेती, दिपक ओहोळ,ज्ञानेश्वर मोरे, वैभव जगताप आदींना संधी दिली . तर उपनगराध्यक्ष पदी माझे सह हनिफ कुरेशी , दादासाहेब सावंत, ॲड . कमलाकर वीर, राजकुमार परदेशी, अहमद कुरेशी , रतनचंद दोशी, श्रीनिवास कांबळे, सत्यभामा बनसुडे आदींना संधी दिली . तसेच अजितसिंग परदेशी , नजीर अहमद कुरेशी, भारत जाधव, गुलाम हुसेन वस्ताद, दादाराम लोंढे, बबन पाटील, ज्ञानदेव फंड, इंदूरे, रासकर, चांदगुडे, मंडलिक, घोलप, फंड, राखुंडे,कुंभार, क्षीरसागर, ढेपे, कांबळे,बनसुडे , आवटे ,यांचे सह अनेक कार्यकर्त्यांना नगरसेवकपदी काम करणेची संधी दिली . जयवंतराव जगताप यांचे खंबीर नेतृत्त्व असले मुळे शहरात कधीही दहशत, जातीयवाद आदी बाबींना थारा मिळाला नाही व शहराचे सामाजीक स्वास्थ्य उत्तमरित्या टिकून राहिले आहे . सर्व जाती - धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत . शहरात जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली बाजार समिती चा सर्वांगीण विकास झाल्यामुळे त्याच्या सकारात्मक परिणामातून सक्षम बाजारपेठ निर्माण होवून अर्थकारणास चालणा मिळाली . शहरात सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या . माजी आ .जगताप यांनी शहरातील शेकडो युवकांना विविध संस्थांमधे नोकरीच्या संधी दिल्या . नोकरी व व्यवसायाच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना उदरनिर्वाहाची संधी दिली .त्यामुळे शहरातील प्रत्येक कुटुंबामधे जगताप यांचे विषयी कृतार्थतेची व आदराची भावना असून सर्वसामान्य जनतेचे अपार प्रेम लाभलेले जयवंतराव जगताप हे तालुक्यातील एकमेव नेतृत्त्व असल्याचे देखील माजी नगराध्यक्ष ढाळे यांनी सांगीतले .

jsjhjaja