आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नसून हा प्रतिनिधीत्वाचा मामला आहे : वामन मेश्राम

*आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नसून हा प्रतिनिधीत्वाचा मामला आहे : वामन मेश्राम*

करमाळा दि. 1
प्रतिनिधी

बामसेफच्या 39 व्या व भारत मुक्ती मोर्चाच्या 12 व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारी अंतर्गत तसेच 6 ऑक्टोबर 2022 रोजी नागपूर येथील आरएसएस हेडकॉटरवर भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. वामन मेश्राम साहेब यांनी काढलेल्या प्रोटेस्ट मोर्चाचे यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल मा. वामनजी मेश्राम साहेब यांचा जाहीर सत्कार व त्या निमित्ताने करमाळा येथे आयोजित सोलापूर जिल्हास्तरीय जाहीर प्रबोधन संमेलनावेळी वामन मेश्राम आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते.

या संमेलनापूर्वी आरपीआय चे प. महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश कांबळे यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्या जवळ मेश्राम यांचा भव्य सत्कार केल्या नंतर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली ज्यामध्ये हजारों लोक सहभागी झाले होते.
यावेळी बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,  राजेग्रुप रंभापुरा, बहुजन मुक्ती पार्टी,जमियत उलेमा ए हिंद, मुस्लिम सामाजिक व आर्थिक उन्नती अभियान, कुर्डुवाडीचे जाफर शेख आणि विविध समविचारी पक्ष, संघटनांनच्या वतीने मेश्राम यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. 

या संमेलनास उद्घाटक म्हणून आरपीआय-ए पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश कांबळे तर प्रमुख अतिथी म्हणून बामसेफचे राष्ट्रीय महासचिव डी. आर. ओहोळ आणि बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुल मखरे उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना मेश्राम म्हणाले की, गरिबी निर्मूलनासाठी  सरकारने विविध योजना, बजेट, महामंडळ स्थापन करणे गरजेचे आहे. परंतु आरक्षण हे गरिबी निर्मूलनाचा मध्यम आहे असा गैरसमज पसरविला जात आहे. आरक्षण हे गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नसून ज्या समाजाचे पर्याप्त प्रतिनिधित्व शासन, प्रशासनात नाही त्यांना पर्याप्त प्रतिनिधित्व देण्यासाठी संविधानामध्ये तशी तरतूद करण्यात आली आहे. असे असे असताना सरकारने सवर्णांच्या गरिबी निर्मूलनाच्या नावाखाली  इडब्लूएस आरक्षण मंजूर करून 
असंवैधानिकरित्या काम केले आहे. एकीकडे ओबीसीसाठी पन्नास टक्केची मर्यादा घालून बावन्न टक्के ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण दिले आहे, आणि दुसरीकडे सवर्णांना त्यांच्या संख्येपेक्षा जास्त शासन प्रशासनात पर्याप्त प्रतिनिधित्व असून इडब्लूएसच्या माध्यमातून आणखी दहा टक्के जास्तीचे आरक्षण दिले आहे. हा ओबीसींवर होणारा अन्याय आहे. 
असंवैधानिक इडब्लूएस आरक्षण त्वरित रद्द करावे अन्यथा त्या विरोधात आम्ही आंदोलन उभारू असा इशारा यावेळी मेश्राम यांनी दिला.

यावेळी डी आर ओहोळ, ऍड राहुल मखरे, नागेश कांबळे, ऍड. तुकाराम राऊत, मौलाना मोहसीन शेख, गणेश करे पाटील, संजय चौधरी, बाळासाहेब पाटील, प्रा. डॉ. मनोजकुमार माने, विक्रमसिंह काटुळे, सुधाकर आवटे, ऍड. भास्कर पवार, भाऊसाहेब कांबळे, दिनेश माने आदी मान्यवरांनी विचार मांडले.

 यावेळी प्रबोधन संमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून करमाळा नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद आणि दीपक ओहोळ यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ता. अध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील, जमियत उलेमा ए हिंदचे मौलाना मोहसीन शेख, संभाजी ब्रिगेड चे नितीन खटके, महिला विंगच्या राज्य प्रभारी उषा थोरात, बहूजन विकास संस्थेचे अध्यक्ष इसाक पठाण, संभाजी ब्रिगेडचे नितीन खटके, भाई राजू मगर, आनंद काशीद, भटके विमुक्त संघटनेचे सुखदेव चव्हाण, मातंग समाज संघटनेचे युवराज पवार, पारधी समाज संघटनेचे अनिल चव्हाण, जिल्हापरिषदचे अभियंता इंजि. सागर नागणे, सामजिक कार्यकर्ते किशोर थोरे, प्रशांत कांबळे, मल्लिनाथ बनसोडे, अजीज नदाफ, सुधाकर आवटे, डॉ. भारत पवार, बी.के. गायकवाड, कुमार लोंढे, शांतीलाल बागवाले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संमेलनाचे प्रास्तविक आर. आर. पाटील यांनी केले तर जनआंदोलन निर्माण निधीची घोषणा कय्युम शेख यांनी केली. सूत्रसंचालन कल्पेश कांबळे यांनी केले तर आभार सिद्धार्थ बोराडे यांनी मानले. 

सदर प्रबोधन संमेलन यशस्वी करण्यासाठी करमाळा व जिल्हा युनिटच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

बहुजन विकास संस्थेच्या वतीने येत्या 7 ऑक्टोबर रोजी लेझर खतना कॅम्पचे आयोजन मुस्लिम बांधवांनी लाभ घेण्याचे केले आवाहन.

विकास कामे ,जनतेचा ठाम विश्वास व पाठबळामुळे नगरपालिका निवड्णुकीत जगताप गटाचा विजय निश्चित : माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे :- करमाळा( प्रतिनिधी राजु सय्यद )करमाळा शहरात गेली २५ वर्षापासून सातत्त्याने अखंडीत, सुरळीत सुरु असलेला पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य यासह कोट्यावधी रुपयांची केलेली विकासकामे शहरवासियांचा माजी आमदार जगताप यांचे नेत्तृत्वावर असलेला गाढा विश्वास, श्रद्धा व नागरीकांना दिलेल्या सोयीसुविधांमुळे येणाऱ्या नगरपरीषद निवडणुकीत जगताप गटाचा विजय निश्चित असल्याचा ठाम आत्मविश्वास माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी व्यक्त केला आहे . याविषयी अधिक माहिती देताना ढाळे यांनी सांगीतले कि,करमाळा नगर परीषद १९९५ सालापासुन मा .आ .जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली जगताप गटाच्या सलग २५ वर्ष ताब्यात आहे .' क' वर्ग नगर परीषद असताना देखील जयवंतराव जगताप यांनी अपक्ष आमदार असताना खास बाब म्हणून उजनी जलाशयावरून दहिगाव येथुन करमाळा शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर करून ती कार्यान्वित केली .२००९ मधे शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार याचा विचार करून १३ कोटीची विस्तारीत पाणी पुरवठा योजना देखील मंजूर करून कार्यान्वित केली . याचा परिणाम म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना , लातूरला रेल्वे व्दारे पाणीपुरवठा होत असताना , सोलापूर व अक्कलकोट सारख्या ठिकाणी १५ - १५ दिवस पाणी येत नव्हते परंतु करमाळा शहरात मात्र अखंडीत , स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा अव्याहतपणे सुरू होता व आहे . त्याचबरोबर शहरातील रस्ते, वीज, आरोग्य, स्वच्छता या बाबी अतिशय सुरळीत असल्यामुळे शहरवासियांची जयवंतरावांच्या नेतृत्वावर अगाढ श्रध्दा व ठाम विश्वास आहे .आगामी काळात शहरात भुयारी गटार योजनेस मंजुरी व निधीची उपलब्धता करून लवकरात लवकर ही योजना पूर्णत्वास नेण्याचा जयवंतराव जगताप यांचा मानस आहे . आमदार संजयमामा शिंदे यांचेसमवेत भुयारी गटार योजना व रस्ते निधी संदर्भात चर्चा होवून त्याचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच या योजनांना मंजूरी व निधीची उपलब्धता निश्चितपणे होणार असल्याची माहिती देखील आमदार शिंदे व माजी आमदार जगताप यांनी दिली आहे .जगताप गटाला करमाळा तालुक्यात कार्यकर्ते व नेते घडविणारी नर्सरी असे संबोधले जाते .जयवंतराव जगताप यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही . बहुसंख्य समाजासह अल्पसंख्य समाजासही त्यांनी राजकारणात न्याय दिला .करमाळा नगर परीषदेच्या नगराध्यक्षपदी त्यांनी युसूफ नालबंद, ॲड .डी.पी. जगताप, सुशीला आगलावे, शौकत नालबंद, सुनीता  वाशिंबेकर, विद्या चिवटे, पुष्पा फंड, अमोद संचेती, दिपक ओहोळ,ज्ञानेश्वर मोरे, वैभव जगताप आदींना संधी दिली . तर उपनगराध्यक्ष पदी माझे सह हनिफ कुरेशी , दादासाहेब सावंत, ॲड . कमलाकर वीर, राजकुमार परदेशी, अहमद कुरेशी , रतनचंद दोशी, श्रीनिवास कांबळे, सत्यभामा बनसुडे आदींना संधी दिली . तसेच अजितसिंग परदेशी , नजीर अहमद कुरेशी, भारत जाधव, गुलाम हुसेन वस्ताद, दादाराम लोंढे, बबन पाटील, ज्ञानदेव फंड, इंदूरे, रासकर, चांदगुडे, मंडलिक, घोलप, फंड, राखुंडे,कुंभार, क्षीरसागर, ढेपे, कांबळे,बनसुडे , आवटे ,यांचे सह अनेक कार्यकर्त्यांना नगरसेवकपदी काम करणेची संधी दिली . जयवंतराव जगताप यांचे खंबीर नेतृत्त्व असले मुळे शहरात कधीही दहशत, जातीयवाद आदी बाबींना थारा मिळाला नाही व शहराचे सामाजीक स्वास्थ्य उत्तमरित्या टिकून राहिले आहे . सर्व जाती - धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत . शहरात जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली बाजार समिती चा सर्वांगीण विकास झाल्यामुळे त्याच्या सकारात्मक परिणामातून सक्षम बाजारपेठ निर्माण होवून अर्थकारणास चालणा मिळाली . शहरात सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या . माजी आ .जगताप यांनी शहरातील शेकडो युवकांना विविध संस्थांमधे नोकरीच्या संधी दिल्या . नोकरी व व्यवसायाच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना उदरनिर्वाहाची संधी दिली .त्यामुळे शहरातील प्रत्येक कुटुंबामधे जगताप यांचे विषयी कृतार्थतेची व आदराची भावना असून सर्वसामान्य जनतेचे अपार प्रेम लाभलेले जयवंतराव जगताप हे तालुक्यातील एकमेव नेतृत्त्व असल्याचे देखील माजी नगराध्यक्ष ढाळे यांनी सांगीतले .

jsjhjaja