राज्य निवडणूक आयोगाचा आदेश रद्द करण्यात यावा : बहुजन मुक्ती पार्टी

*राज्य निवडणूक आयोगाचा आदेश रद्द करण्यात यावा : बहुजन मुक्ती पार्टी*

करमाळा दि. ९ प्रतिनिधी 

अनुसुचीत जाती / जमातीच्या ग्रामपंचायत मधील राजकीय आरक्षणासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने ३ फेब्रुवारी २०२२ रोजी काढलेला आदेश रद्द करून पूर्वीच्या पद्धतीने आरक्षण सोडत करण्यात यावी या मागणीचे निवेदन बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य निवडणूक आयोगाला करमाळा युनिटच्या वतीने देण्यात आले. 

यावेळी सदरचे निवेदन नायब तहसीलदार सुभाष बदे यांनी स्वीकारले.

सदर निवेदनामध्ये म्हटले आहे कि,  राज्य निवडणूक आयोगाने ३ फेब्रुवारी २०२२ रोजी काढलेला आदेशप्रमाणे महाराष्ट्रात सन २०२२ मध्ये होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत चाक्रनुक्रमे पद्धतीने काढण्यात आली आहे. त्यामध्ये असे दिसून येते कि, अनुसुचीत जाती / जमातीचे मतदार ज्या प्रभागात नगण्य आहेत अथवा शून्य आहेत अशा प्रभागांमध्ये अनुसुचीत जाती / जमातीचे आरक्षण पडलेले आहे. हा अनुसुचीत जाती / जमातीच्या उमेदवार व मतदार यांचेवर अन्याय आहे. कारण राखीव मतदारसंघाच्या तत्वाप्रमाणे अनुसुचीत जाती / जमातीची संख्या ज्या मतदारसंघात जास्त असते तिथेच असे आरक्षण पडत असते. त्यामुळे लोक आपला सच्चा व समाजाप्रती इमानदार प्रतिनिधी आपल्या मताद्वारे निवडून देऊ शकतात. ज्या प्रभागात अनुसुचीत जाती / जमातीचे मतदारच नसतील किंवा नगण्य असतील तिथे आरक्षण पडल्यामुळे एकतर पक्ष किंवा पक्षप्रमुख ज्या अनुसुचीत जाती / जमातीच्या उमेदवाराचे समर्थन करतील तोच उमेदवार निवडून येईल. त्यामुळे तो समाजाचा सच्चा व इमानदार न राहता पक्षाचा गुलाम म्हणून काम करेल. त्यामुळे सदर आदेश तत्काळ रद्द करून पूर्वीच्या पद्धतीने म्हणजेच ज्या प्रभागत अनुसुचीत जाती / जमातीचे मतदार बहुसंखेने राहत असतील तिथेच अनुसुचीत जाती / जमातीचे आरक्षण पडावे. राज्य निवडणूक आयोगाने ३ फेब्रुवारी २०२२ रोजी काढलेला आदेश १० दिवसात रद्द करून पूर्वीच्या पद्धतीने नव्याने आरक्षण सोडत न काढल्यास राज्यव्यापी आंदोलनाच इशारा सदर निवेदनात दिला आहे.

यावेळी बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी तालुका अध्यक्ष दिनेश माने, माढा लोकसभा प्रभारी आर. आर. पाटील, करमाळा माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ, अरुण माने, गौतम खरात, कय्युम शेख, गोविंदा खरात, प्रेमकुमार सरतापे, भीमराव कांबळे, दिनेश दळवी आदीजण उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बहुजन विकास संस्थेच्या वतीने येत्या 7 ऑक्टोबर रोजी लेझर खतना कॅम्पचे आयोजन मुस्लिम बांधवांनी लाभ घेण्याचे केले आवाहन.

विकास कामे ,जनतेचा ठाम विश्वास व पाठबळामुळे नगरपालिका निवड्णुकीत जगताप गटाचा विजय निश्चित : माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे :- करमाळा( प्रतिनिधी राजु सय्यद )करमाळा शहरात गेली २५ वर्षापासून सातत्त्याने अखंडीत, सुरळीत सुरु असलेला पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य यासह कोट्यावधी रुपयांची केलेली विकासकामे शहरवासियांचा माजी आमदार जगताप यांचे नेत्तृत्वावर असलेला गाढा विश्वास, श्रद्धा व नागरीकांना दिलेल्या सोयीसुविधांमुळे येणाऱ्या नगरपरीषद निवडणुकीत जगताप गटाचा विजय निश्चित असल्याचा ठाम आत्मविश्वास माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी व्यक्त केला आहे . याविषयी अधिक माहिती देताना ढाळे यांनी सांगीतले कि,करमाळा नगर परीषद १९९५ सालापासुन मा .आ .जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली जगताप गटाच्या सलग २५ वर्ष ताब्यात आहे .' क' वर्ग नगर परीषद असताना देखील जयवंतराव जगताप यांनी अपक्ष आमदार असताना खास बाब म्हणून उजनी जलाशयावरून दहिगाव येथुन करमाळा शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर करून ती कार्यान्वित केली .२००९ मधे शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार याचा विचार करून १३ कोटीची विस्तारीत पाणी पुरवठा योजना देखील मंजूर करून कार्यान्वित केली . याचा परिणाम म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना , लातूरला रेल्वे व्दारे पाणीपुरवठा होत असताना , सोलापूर व अक्कलकोट सारख्या ठिकाणी १५ - १५ दिवस पाणी येत नव्हते परंतु करमाळा शहरात मात्र अखंडीत , स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा अव्याहतपणे सुरू होता व आहे . त्याचबरोबर शहरातील रस्ते, वीज, आरोग्य, स्वच्छता या बाबी अतिशय सुरळीत असल्यामुळे शहरवासियांची जयवंतरावांच्या नेतृत्वावर अगाढ श्रध्दा व ठाम विश्वास आहे .आगामी काळात शहरात भुयारी गटार योजनेस मंजुरी व निधीची उपलब्धता करून लवकरात लवकर ही योजना पूर्णत्वास नेण्याचा जयवंतराव जगताप यांचा मानस आहे . आमदार संजयमामा शिंदे यांचेसमवेत भुयारी गटार योजना व रस्ते निधी संदर्भात चर्चा होवून त्याचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच या योजनांना मंजूरी व निधीची उपलब्धता निश्चितपणे होणार असल्याची माहिती देखील आमदार शिंदे व माजी आमदार जगताप यांनी दिली आहे .जगताप गटाला करमाळा तालुक्यात कार्यकर्ते व नेते घडविणारी नर्सरी असे संबोधले जाते .जयवंतराव जगताप यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही . बहुसंख्य समाजासह अल्पसंख्य समाजासही त्यांनी राजकारणात न्याय दिला .करमाळा नगर परीषदेच्या नगराध्यक्षपदी त्यांनी युसूफ नालबंद, ॲड .डी.पी. जगताप, सुशीला आगलावे, शौकत नालबंद, सुनीता  वाशिंबेकर, विद्या चिवटे, पुष्पा फंड, अमोद संचेती, दिपक ओहोळ,ज्ञानेश्वर मोरे, वैभव जगताप आदींना संधी दिली . तर उपनगराध्यक्ष पदी माझे सह हनिफ कुरेशी , दादासाहेब सावंत, ॲड . कमलाकर वीर, राजकुमार परदेशी, अहमद कुरेशी , रतनचंद दोशी, श्रीनिवास कांबळे, सत्यभामा बनसुडे आदींना संधी दिली . तसेच अजितसिंग परदेशी , नजीर अहमद कुरेशी, भारत जाधव, गुलाम हुसेन वस्ताद, दादाराम लोंढे, बबन पाटील, ज्ञानदेव फंड, इंदूरे, रासकर, चांदगुडे, मंडलिक, घोलप, फंड, राखुंडे,कुंभार, क्षीरसागर, ढेपे, कांबळे,बनसुडे , आवटे ,यांचे सह अनेक कार्यकर्त्यांना नगरसेवकपदी काम करणेची संधी दिली . जयवंतराव जगताप यांचे खंबीर नेतृत्त्व असले मुळे शहरात कधीही दहशत, जातीयवाद आदी बाबींना थारा मिळाला नाही व शहराचे सामाजीक स्वास्थ्य उत्तमरित्या टिकून राहिले आहे . सर्व जाती - धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत . शहरात जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली बाजार समिती चा सर्वांगीण विकास झाल्यामुळे त्याच्या सकारात्मक परिणामातून सक्षम बाजारपेठ निर्माण होवून अर्थकारणास चालणा मिळाली . शहरात सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या . माजी आ .जगताप यांनी शहरातील शेकडो युवकांना विविध संस्थांमधे नोकरीच्या संधी दिल्या . नोकरी व व्यवसायाच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना उदरनिर्वाहाची संधी दिली .त्यामुळे शहरातील प्रत्येक कुटुंबामधे जगताप यांचे विषयी कृतार्थतेची व आदराची भावना असून सर्वसामान्य जनतेचे अपार प्रेम लाभलेले जयवंतराव जगताप हे तालुक्यातील एकमेव नेतृत्त्व असल्याचे देखील माजी नगराध्यक्ष ढाळे यांनी सांगीतले .

jsjhjaja