मुदत संपलेल्या व नवनिर्मित एकूण २०७ नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र राज्यातील एप्रिल २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या व नवनिर्मित एकूण २०७ नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला आहे. 

त्यानुसार मा . सर्वोच्च न्यायालयाने SLP क्र . १ ९ ७५६ / २०२१ मधील मा . सर्वोच्च न्यायालयाचे दि .०४ / ०५ / २०२२ रोजीचे आदेश . महोदय / महोदया , ज्याअर्थी , राज्य निवडणूक आयोगाने उपरोक्त संदर्भाधीन क्र . २ येथील पत्रान्वये राज्यातील माहे मे २०२० ते माहे फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या " अ " वर्गातील एकूण १६ , माहे मे २०२० ते माहे मार्च २०२२ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या अशा एकूण " ब " वर्गातील ६७ आणि माहे एप्रिल- २०२० ते माहे फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या " क " वर्गातील १२० तसेच नवनिर्मित ४ नगरपरिषदांसह एकूण २०७ ( अ + ब + क- २०७ नगरपरिषदा ) सोबतच्या परिशिष्ट -४ मध्ये नमूद नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अधिनियमातील तरतुदीनुसार प्रभाग रचना कार्यक्रम दिला होता . त्यानुसार    मा . सर्वोच्च न्यायालयाने दि .०४ / ०५ / २०२२ रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने संदर्भाधीन क्रमांक अन्वये जाहीर करण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचनेच्या कार्यक्रमाबाबत खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहेत : आदेश अ ) राज्य निवडणूक आयोगाने वरील परिच्छेद -१ मधील नमूद सर्व नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि .२२ / ०२ / २०२२ रोजी प्रभाग रचना निर्गमित केला होता . सदर कार्यक्रमानुसार आक्षेप व हरकतीचा कालावधी दि . १०/०३/२०२२ ते दि . १७/०३/२०२२ असा होता . मा . सर्वोच्च न्यायालयाने SLP क्र . १ ९ ७५६ / २०२१ मधील दि . ०४/०५/२०२२ च्या आदेशास अनुसरून राज्य निवडणूक आयोगाच्या दि . १०/०३/२०२२ रोजी सुरु असलेल्या टप्प्यांपासून निवडणुकांची कार्यवाही त्वरीत सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत . यास अनुसरुन प्रारूप प्रभाग रचनेवर आक्षेप व हरकतीच्या टप्प्यापासून प्रभाग रचनेच्या अनुषंगाने खालील प्रमाणे सुधारीत कार्यक्रम देण्यात येत आहे . तसेच सोबत जोडलेल्या परिशिष्ट -१,२ व ३ नुसार आक्षेप व हरकतीच्या टप्प्यापासूनच्या सुधारित कार्यक्रमानुसार कार्यवाही करण्यात यावी . ब ) प्रभाग रचना अंतिम करण्याबाबतचे यापूर्वीचे संबंधित आदेश अधिक्रमित करुन राज्य निवडणूक आयुक्त यांनी त्यांचे अधिकार रानिआ आदेश क्र . रानिआ / नप २०२० / प्र.क्र .१ - अ / का .६ , दिनांक ०६/०२/२०२० अन्वये संबंधित मुख्याधिकारी , जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना प्रदान केले आहेत . क ) नगरपरिषदांच्या निवडणुकांकरिता निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना दि . १० मार्च , २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आली असून दि .१० / ०३ / २०२२ पासून प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त झालेल्या आक्षेप व हरकतींसह सुधारित कार्यक्रमानुसार नव्याने प्राप्त होणाऱ्या आक्षेप व हरकतींवर सुनावणी देण्यात यावी . तसेच सदर वेळापत्रकानुसार प्रत्येक टप्पा वेळेवर व योग्य रितीने पूर्ण करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची राहील . त्यानुसार त्यांनी योग्य ती सर्व उपाययोजना करावी . ५ . नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम यथावकाश राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात येईल . ६. राज्य निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार परिशिष्ट -४ मधील नमूद नगरपरिषदांबाबत प्रभाग रचना करण्यास बाधा येणारी कोणतीही बाब जसे न्यायालयीन प्रकरण इ . बाबतची माहिती आयोगास तात्काळ अवगत करावी .



त्यानुसार करमाळा  नगर परिषदचा क वर्ग नगरपरिषदेत सामावेश होत असल्याने प्रभाग रचना कार्यक्रम -२०२२ परिशिष्ट -३ ( " क " वर्ग नगरपरिषदांसाठी ) मा . सर्वोच्च न्यायालयाने SLP क्र . १ ९ ७५६ / २०२१ मधील दि .०४ / ०५ / २०२२ च्या आदेशास अनुसरुन राज्य निवडणूक आयोगाच्या दि .१० / ०३ / २०२२ रोजी सुरु असलेल्या टप्प्यांपासून निवडणुकांची कार्यवाही त्वरीत सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत . यास अनुसरून प्रारूप प्रभाग रचनेवर आक्षेप व हरकती पासून प्रभाग रचनेच्या अनुषंगाने खालील प्रमाणे सुधारीत कार्यक्रम देण्यात येत आहे . त्यानुसार

अ ) प्रारूप प्रभाग रचना १. हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी १०/०५/२०२२ ( मंगळवार ) ते १४/०५/२०२२ ( शनिवार ) पर्यंत २. प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी देणे . जिल्हाधिकारी २३/०५/२०२२ ( सोमवार ) पर्यंत ३ . हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन संबंधित जिल्हाधिकारी ३०/०५/२०२२ | विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक , नगरपरिषद प्रशासन यांचेकडे अहवाल पाठविणे ( सोमवार ) पर्यंत ४ . अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणे . संबंधित विभागीय ०६/०६/२०२२ आयुक्त ( सोमवार ) पर्यंत ब ) अंतिम प्रभाग रचना ( प्रभाग निहाय एकूण लोकसंख्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची लोकसंख्या ) अधिनियमातील कलम १० नुसार अंतिम अधिसूचना जिल्हाधिकारी ०७/०६/२०२२ | वृत्तपत्रात व स्थानिकपातळीवर तसेच जिल्हाधिकारी ( मंगळवार ) पर्यंत | कार्यालय व नगरपरिषदांच्या वेबसाईटवर प्रसिध्द करणे . टीपा- प्रत्येक नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना प्रसिध्द करण्यापर्यंतच्या कामावर नियंत्रण ठेवण्याकरीता जिल्हाधिकारी यांनी उप जिल्हाधिकारीपेक्षा कमी नसलेल्या दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी . असे आदेश महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग सचिव किरण कुरुंदकर यांनी दिले आहेत. 

Comments

Popular posts from this blog

बहुजन विकास संस्थेच्या वतीने येत्या 7 ऑक्टोबर रोजी लेझर खतना कॅम्पचे आयोजन मुस्लिम बांधवांनी लाभ घेण्याचे केले आवाहन.

विकास कामे ,जनतेचा ठाम विश्वास व पाठबळामुळे नगरपालिका निवड्णुकीत जगताप गटाचा विजय निश्चित : माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे :- करमाळा( प्रतिनिधी राजु सय्यद )करमाळा शहरात गेली २५ वर्षापासून सातत्त्याने अखंडीत, सुरळीत सुरु असलेला पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य यासह कोट्यावधी रुपयांची केलेली विकासकामे शहरवासियांचा माजी आमदार जगताप यांचे नेत्तृत्वावर असलेला गाढा विश्वास, श्रद्धा व नागरीकांना दिलेल्या सोयीसुविधांमुळे येणाऱ्या नगरपरीषद निवडणुकीत जगताप गटाचा विजय निश्चित असल्याचा ठाम आत्मविश्वास माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी व्यक्त केला आहे . याविषयी अधिक माहिती देताना ढाळे यांनी सांगीतले कि,करमाळा नगर परीषद १९९५ सालापासुन मा .आ .जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली जगताप गटाच्या सलग २५ वर्ष ताब्यात आहे .' क' वर्ग नगर परीषद असताना देखील जयवंतराव जगताप यांनी अपक्ष आमदार असताना खास बाब म्हणून उजनी जलाशयावरून दहिगाव येथुन करमाळा शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर करून ती कार्यान्वित केली .२००९ मधे शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार याचा विचार करून १३ कोटीची विस्तारीत पाणी पुरवठा योजना देखील मंजूर करून कार्यान्वित केली . याचा परिणाम म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना , लातूरला रेल्वे व्दारे पाणीपुरवठा होत असताना , सोलापूर व अक्कलकोट सारख्या ठिकाणी १५ - १५ दिवस पाणी येत नव्हते परंतु करमाळा शहरात मात्र अखंडीत , स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा अव्याहतपणे सुरू होता व आहे . त्याचबरोबर शहरातील रस्ते, वीज, आरोग्य, स्वच्छता या बाबी अतिशय सुरळीत असल्यामुळे शहरवासियांची जयवंतरावांच्या नेतृत्वावर अगाढ श्रध्दा व ठाम विश्वास आहे .आगामी काळात शहरात भुयारी गटार योजनेस मंजुरी व निधीची उपलब्धता करून लवकरात लवकर ही योजना पूर्णत्वास नेण्याचा जयवंतराव जगताप यांचा मानस आहे . आमदार संजयमामा शिंदे यांचेसमवेत भुयारी गटार योजना व रस्ते निधी संदर्भात चर्चा होवून त्याचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच या योजनांना मंजूरी व निधीची उपलब्धता निश्चितपणे होणार असल्याची माहिती देखील आमदार शिंदे व माजी आमदार जगताप यांनी दिली आहे .जगताप गटाला करमाळा तालुक्यात कार्यकर्ते व नेते घडविणारी नर्सरी असे संबोधले जाते .जयवंतराव जगताप यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही . बहुसंख्य समाजासह अल्पसंख्य समाजासही त्यांनी राजकारणात न्याय दिला .करमाळा नगर परीषदेच्या नगराध्यक्षपदी त्यांनी युसूफ नालबंद, ॲड .डी.पी. जगताप, सुशीला आगलावे, शौकत नालबंद, सुनीता  वाशिंबेकर, विद्या चिवटे, पुष्पा फंड, अमोद संचेती, दिपक ओहोळ,ज्ञानेश्वर मोरे, वैभव जगताप आदींना संधी दिली . तर उपनगराध्यक्ष पदी माझे सह हनिफ कुरेशी , दादासाहेब सावंत, ॲड . कमलाकर वीर, राजकुमार परदेशी, अहमद कुरेशी , रतनचंद दोशी, श्रीनिवास कांबळे, सत्यभामा बनसुडे आदींना संधी दिली . तसेच अजितसिंग परदेशी , नजीर अहमद कुरेशी, भारत जाधव, गुलाम हुसेन वस्ताद, दादाराम लोंढे, बबन पाटील, ज्ञानदेव फंड, इंदूरे, रासकर, चांदगुडे, मंडलिक, घोलप, फंड, राखुंडे,कुंभार, क्षीरसागर, ढेपे, कांबळे,बनसुडे , आवटे ,यांचे सह अनेक कार्यकर्त्यांना नगरसेवकपदी काम करणेची संधी दिली . जयवंतराव जगताप यांचे खंबीर नेतृत्त्व असले मुळे शहरात कधीही दहशत, जातीयवाद आदी बाबींना थारा मिळाला नाही व शहराचे सामाजीक स्वास्थ्य उत्तमरित्या टिकून राहिले आहे . सर्व जाती - धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत . शहरात जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली बाजार समिती चा सर्वांगीण विकास झाल्यामुळे त्याच्या सकारात्मक परिणामातून सक्षम बाजारपेठ निर्माण होवून अर्थकारणास चालणा मिळाली . शहरात सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या . माजी आ .जगताप यांनी शहरातील शेकडो युवकांना विविध संस्थांमधे नोकरीच्या संधी दिल्या . नोकरी व व्यवसायाच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना उदरनिर्वाहाची संधी दिली .त्यामुळे शहरातील प्रत्येक कुटुंबामधे जगताप यांचे विषयी कृतार्थतेची व आदराची भावना असून सर्वसामान्य जनतेचे अपार प्रेम लाभलेले जयवंतराव जगताप हे तालुक्यातील एकमेव नेतृत्त्व असल्याचे देखील माजी नगराध्यक्ष ढाळे यांनी सांगीतले .

jsjhjaja