स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका मे महिन्यातच होणार ,एप्रिल मध्ये लागु शकते आचारसंहितेची.

*निवडणूका मे महिन्यातच होणार, एप्रिल मध्ये लागू शकते आचारसंहिता ?*

-निवडणूकीचा अचानक केंव्हाही फुटू शकतो बॅाम्ब.
दि. २५ मार्च २०२२
सध्या महाराष्ट्रातील महानगरपालिकांसह जिल्हा परिषदेच्या निवडणूका ओबीसी आरक्षणामूळे सहा महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, या सर्व निवडणूका मे महिन्यातच होणार असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे. त्या दृष्ट्रीने सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. तसेच प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी सुद्धा मे महिन्यात निवडणूका होणार असल्याच्या वृत्तास दूजोरा देत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था व नागरी स्वराज्य संस्था या लोकशाहीतील महत्वपुर्ण संस्था आहेत. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायत या संस्थांच्या निवडणूका संपन्न होणार होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका नको म्हणून सत्ताधा-यांसह विरोधकांनी निवडणूका सहा महिने पुढे ढकलण्याचा कायदा विधिमंडळात पारीत केला. मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य निवडणूक आयोगाचे प्रभाग रचना करणे, आरक्षण व मतदानाची तारीख ठरविण्याचे अधिकार महाराष्ट्र शासनाने कायदा करुन स्वतःकडे घेतले आहेत.
ओसीबी आरक्षण पुर्ववत होण्यासाठी इम्पीरिकल डाटा गोळा करणे महत्वाचे आहे. हा इम्पीरिकल डाटा गोळा करण्यासाठी राज्य सरकारला किमान सहा महिन्यांचा कालावधी हवा आहे. तेंव्हा, होऊ घातलेल्या निवडणूका या विना ओसीबी आरक्षणाच्या होऊ नये म्हणून सरकारने त्या पुढे ढकलण्याची खेळी केली आहे.
परंतू, सरकारने जरी कायदा करुन निवडणूका सहा महिने पुढे ढकलल्या असल्या तरी निवडणूका या मे महिन्यातच होणार असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे. तशी चर्चा सत्ताधारी पक्ष व त्यांचे विविध पदाधिकारी यांच्यामध्ये सुरु आहे. त्या दृष्ट्रीने शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष तयारी करीत आहेत. कारण, येत्या दहा ते पंधरा दिवसात आचारसंहिता लागू शकते. त्यामूळे या निवडणूका मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या विविध उद्धघाटन समारंभ प्रसंगी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूका कधी ही होऊ शकतात. तेंव्हा, सर्व पक्षीय उमेदवारांनी तयार रहावे असं आवाहन केलं होतं. तसेच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या या आठवड्यात झालेल्या विविध बैठकांमध्ये ही वरिष्ठांकडून पदाधिका-यांना निवडणूका सहा महिन्याच्या आत होऊ शकतात त्यामूळे सर्व तयारी ठेवा असे आदेश दिले जात आहेत. म्हणून जो सदैव निवडणूकीच्या मोड मध्ये राहील तोच विजयी पताका फडकावेल असं बोललं जात आहे.
निवडणूका जर २५ मे ला होणार असतील तर त्याची आचारसंहिता २० एप्रिला लागायला हवी. कारण, सध्या निवडणूक आयोग ३० किंवा ३५ दिवसांचीच आचारसंहिता जाहिर करतात. पुर्वी आचारसंहिता ही ४५ दिवसांची असायची. मात्र, सततच्या निवडणूका व त्यामूळे विकासकामांना होणारी अडचण ओळखून निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे दिवस कमी केले आहेत. अलिकडील काही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांमध्ये तर २५ दिवसांची आचारसंहिता ठेवल्याची दिसून आलं आहे.
मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने केलेला कायदा जर न्यायालयात मान्य झाला तर या निवडणूका सहा महिने किंवा त्याही पेक्षा जास्त दिवस लांबू शकतात. म्हणून निवडणूकांचा फैसला हा न्यायालयाच्या हातात आहे.

Comments

Popular posts from this blog

बहुजन विकास संस्थेच्या वतीने येत्या 7 ऑक्टोबर रोजी लेझर खतना कॅम्पचे आयोजन मुस्लिम बांधवांनी लाभ घेण्याचे केले आवाहन.

विकास कामे ,जनतेचा ठाम विश्वास व पाठबळामुळे नगरपालिका निवड्णुकीत जगताप गटाचा विजय निश्चित : माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे :- करमाळा( प्रतिनिधी राजु सय्यद )करमाळा शहरात गेली २५ वर्षापासून सातत्त्याने अखंडीत, सुरळीत सुरु असलेला पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य यासह कोट्यावधी रुपयांची केलेली विकासकामे शहरवासियांचा माजी आमदार जगताप यांचे नेत्तृत्वावर असलेला गाढा विश्वास, श्रद्धा व नागरीकांना दिलेल्या सोयीसुविधांमुळे येणाऱ्या नगरपरीषद निवडणुकीत जगताप गटाचा विजय निश्चित असल्याचा ठाम आत्मविश्वास माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी व्यक्त केला आहे . याविषयी अधिक माहिती देताना ढाळे यांनी सांगीतले कि,करमाळा नगर परीषद १९९५ सालापासुन मा .आ .जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली जगताप गटाच्या सलग २५ वर्ष ताब्यात आहे .' क' वर्ग नगर परीषद असताना देखील जयवंतराव जगताप यांनी अपक्ष आमदार असताना खास बाब म्हणून उजनी जलाशयावरून दहिगाव येथुन करमाळा शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर करून ती कार्यान्वित केली .२००९ मधे शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार याचा विचार करून १३ कोटीची विस्तारीत पाणी पुरवठा योजना देखील मंजूर करून कार्यान्वित केली . याचा परिणाम म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना , लातूरला रेल्वे व्दारे पाणीपुरवठा होत असताना , सोलापूर व अक्कलकोट सारख्या ठिकाणी १५ - १५ दिवस पाणी येत नव्हते परंतु करमाळा शहरात मात्र अखंडीत , स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा अव्याहतपणे सुरू होता व आहे . त्याचबरोबर शहरातील रस्ते, वीज, आरोग्य, स्वच्छता या बाबी अतिशय सुरळीत असल्यामुळे शहरवासियांची जयवंतरावांच्या नेतृत्वावर अगाढ श्रध्दा व ठाम विश्वास आहे .आगामी काळात शहरात भुयारी गटार योजनेस मंजुरी व निधीची उपलब्धता करून लवकरात लवकर ही योजना पूर्णत्वास नेण्याचा जयवंतराव जगताप यांचा मानस आहे . आमदार संजयमामा शिंदे यांचेसमवेत भुयारी गटार योजना व रस्ते निधी संदर्भात चर्चा होवून त्याचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच या योजनांना मंजूरी व निधीची उपलब्धता निश्चितपणे होणार असल्याची माहिती देखील आमदार शिंदे व माजी आमदार जगताप यांनी दिली आहे .जगताप गटाला करमाळा तालुक्यात कार्यकर्ते व नेते घडविणारी नर्सरी असे संबोधले जाते .जयवंतराव जगताप यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही . बहुसंख्य समाजासह अल्पसंख्य समाजासही त्यांनी राजकारणात न्याय दिला .करमाळा नगर परीषदेच्या नगराध्यक्षपदी त्यांनी युसूफ नालबंद, ॲड .डी.पी. जगताप, सुशीला आगलावे, शौकत नालबंद, सुनीता  वाशिंबेकर, विद्या चिवटे, पुष्पा फंड, अमोद संचेती, दिपक ओहोळ,ज्ञानेश्वर मोरे, वैभव जगताप आदींना संधी दिली . तर उपनगराध्यक्ष पदी माझे सह हनिफ कुरेशी , दादासाहेब सावंत, ॲड . कमलाकर वीर, राजकुमार परदेशी, अहमद कुरेशी , रतनचंद दोशी, श्रीनिवास कांबळे, सत्यभामा बनसुडे आदींना संधी दिली . तसेच अजितसिंग परदेशी , नजीर अहमद कुरेशी, भारत जाधव, गुलाम हुसेन वस्ताद, दादाराम लोंढे, बबन पाटील, ज्ञानदेव फंड, इंदूरे, रासकर, चांदगुडे, मंडलिक, घोलप, फंड, राखुंडे,कुंभार, क्षीरसागर, ढेपे, कांबळे,बनसुडे , आवटे ,यांचे सह अनेक कार्यकर्त्यांना नगरसेवकपदी काम करणेची संधी दिली . जयवंतराव जगताप यांचे खंबीर नेतृत्त्व असले मुळे शहरात कधीही दहशत, जातीयवाद आदी बाबींना थारा मिळाला नाही व शहराचे सामाजीक स्वास्थ्य उत्तमरित्या टिकून राहिले आहे . सर्व जाती - धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत . शहरात जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली बाजार समिती चा सर्वांगीण विकास झाल्यामुळे त्याच्या सकारात्मक परिणामातून सक्षम बाजारपेठ निर्माण होवून अर्थकारणास चालणा मिळाली . शहरात सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या . माजी आ .जगताप यांनी शहरातील शेकडो युवकांना विविध संस्थांमधे नोकरीच्या संधी दिल्या . नोकरी व व्यवसायाच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना उदरनिर्वाहाची संधी दिली .त्यामुळे शहरातील प्रत्येक कुटुंबामधे जगताप यांचे विषयी कृतार्थतेची व आदराची भावना असून सर्वसामान्य जनतेचे अपार प्रेम लाभलेले जयवंतराव जगताप हे तालुक्यातील एकमेव नेतृत्त्व असल्याचे देखील माजी नगराध्यक्ष ढाळे यांनी सांगीतले .

jsjhjaja