करमाळा शहरात भुरट्या भावी नगरसेवकांच्या सुळसुळाट

निवडणुकीच्या तोंडावर भुरट्या भावी नगरसेवकांचा सुळसुळाट. 

"ना राजकारणाचं ज्ञान,ना प्रभागातील समस्यांची जाण, ना सामाजिक भान."

करमाळा नगरपालिका निवडणूकीचे पडघम जसजसे वाजु लागले आहेत तसतसे शहराच्या गल्ली बोळातुन नवनवीन "'भावी नगरसेवकांची'" पैदास होऊ लागली आहे.ज्यांच्याकडे राजकारणाचं ज्ञान नाही अश्या लोकांना सुद्धा नगर सेवक पदाची स्वप्ने पडू लागली आहेत. शहरातील व्हाट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुप अशा सोशल मीडियावर झळकणारे स्टेटस फोटो व व्हिडिओ बनवून काही भुरटे कार्यकर्ते प्रसारित करीत असतात. त्यातून या भावींना आपण नगरसेवक असल्याचा "फील" देखील यायला सुरवात होते. काही भावी नगरसेवक तर असे आहेत स्वतः जन्म दिलेल्या लेकरांची लग्नसुद्धा "वर्गणी" करून लावले आहेत.अशा लोकांना सुद्धा नगरसेवकाचे स्वप्ने पडू लागली आहे.
विशेष म्हणजे हे सर्व भावी नगरसेवक ज्याप्रकारे पावसाळा आल्यावर लपलेली बेडकं कशी बाहेर पडतात तशी फक्त निवडणूक जवळ आली की निवडणुकीपुरतीच बाहेर पडतात. दरम्यानच्या साडे चार वर्षाच्या कालावधीत हे कुठेच दिसत नाहीत आणि प्रभागातील एकाही प्रश्नावर हे आवाज उठवत नाहीत की साधं प्रशासनाला एक निवेदनही देत नाहीत.याचं मुख्य कारण म्हणजे यांना प्रभागातील समस्याच माहित नसतात आणि माहित असलं तरी बघु निवडणूक आल्यावर या वृत्तीमुळे गप्पं राहतात. अनेकदा प्रभागातील मतदारांनाही हा कोण नवीन उगवला असा प्रश्न पडणे इतपत. हा भावी नगरसेवक नवीन असतो पण निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी फाफट कार्यक्रम घेऊन आपण किती कार्यक्षम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातच कोणी अनुभवी नागरिकाने मार्गदर्शन केले  तरी त्यांचा सल्ला फाट्यावर मारत आपण किती अतिशहाणे आहोत हे दाखवून द्यायचे. याचा शेवट हा आपल्याच पायावर धोंडा मारून  घेण्यासारखे आहे हे मात्र त्यांच्या ध्यानात ही येत नाही. 
अश्या संधी साधु आणि भुरट्या भावी नगरसेवकांना मतदारांनी त्यांची जागा दाखवणे गरजेचे आहे.भावी असो की विद्यमान नगरसेवक 'पाच वर्षांत तुम्ही प्रभागासाठी काय केलं? हा जाब सामान्य मतदारांनी विचारले पाहिजे. पैसा आणि दारू, मटणाला न जुमानता, तळमळीने काम करणाऱ्या गरीब कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहून त्याला काम करण्याची संधी दिली पाहिजे तर आणि तरच प्रभागातील सच्चा आणि खऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळेल आणि अश्या भुरट्या भावी नगरसेवकांच्या उत्पतीला आळा बसेल.

Comments

Popular posts from this blog

बहुजन विकास संस्थेच्या वतीने येत्या 7 ऑक्टोबर रोजी लेझर खतना कॅम्पचे आयोजन मुस्लिम बांधवांनी लाभ घेण्याचे केले आवाहन.

विकास कामे ,जनतेचा ठाम विश्वास व पाठबळामुळे नगरपालिका निवड्णुकीत जगताप गटाचा विजय निश्चित : माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे :- करमाळा( प्रतिनिधी राजु सय्यद )करमाळा शहरात गेली २५ वर्षापासून सातत्त्याने अखंडीत, सुरळीत सुरु असलेला पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य यासह कोट्यावधी रुपयांची केलेली विकासकामे शहरवासियांचा माजी आमदार जगताप यांचे नेत्तृत्वावर असलेला गाढा विश्वास, श्रद्धा व नागरीकांना दिलेल्या सोयीसुविधांमुळे येणाऱ्या नगरपरीषद निवडणुकीत जगताप गटाचा विजय निश्चित असल्याचा ठाम आत्मविश्वास माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी व्यक्त केला आहे . याविषयी अधिक माहिती देताना ढाळे यांनी सांगीतले कि,करमाळा नगर परीषद १९९५ सालापासुन मा .आ .जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली जगताप गटाच्या सलग २५ वर्ष ताब्यात आहे .' क' वर्ग नगर परीषद असताना देखील जयवंतराव जगताप यांनी अपक्ष आमदार असताना खास बाब म्हणून उजनी जलाशयावरून दहिगाव येथुन करमाळा शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर करून ती कार्यान्वित केली .२००९ मधे शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार याचा विचार करून १३ कोटीची विस्तारीत पाणी पुरवठा योजना देखील मंजूर करून कार्यान्वित केली . याचा परिणाम म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना , लातूरला रेल्वे व्दारे पाणीपुरवठा होत असताना , सोलापूर व अक्कलकोट सारख्या ठिकाणी १५ - १५ दिवस पाणी येत नव्हते परंतु करमाळा शहरात मात्र अखंडीत , स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा अव्याहतपणे सुरू होता व आहे . त्याचबरोबर शहरातील रस्ते, वीज, आरोग्य, स्वच्छता या बाबी अतिशय सुरळीत असल्यामुळे शहरवासियांची जयवंतरावांच्या नेतृत्वावर अगाढ श्रध्दा व ठाम विश्वास आहे .आगामी काळात शहरात भुयारी गटार योजनेस मंजुरी व निधीची उपलब्धता करून लवकरात लवकर ही योजना पूर्णत्वास नेण्याचा जयवंतराव जगताप यांचा मानस आहे . आमदार संजयमामा शिंदे यांचेसमवेत भुयारी गटार योजना व रस्ते निधी संदर्भात चर्चा होवून त्याचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच या योजनांना मंजूरी व निधीची उपलब्धता निश्चितपणे होणार असल्याची माहिती देखील आमदार शिंदे व माजी आमदार जगताप यांनी दिली आहे .जगताप गटाला करमाळा तालुक्यात कार्यकर्ते व नेते घडविणारी नर्सरी असे संबोधले जाते .जयवंतराव जगताप यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही . बहुसंख्य समाजासह अल्पसंख्य समाजासही त्यांनी राजकारणात न्याय दिला .करमाळा नगर परीषदेच्या नगराध्यक्षपदी त्यांनी युसूफ नालबंद, ॲड .डी.पी. जगताप, सुशीला आगलावे, शौकत नालबंद, सुनीता  वाशिंबेकर, विद्या चिवटे, पुष्पा फंड, अमोद संचेती, दिपक ओहोळ,ज्ञानेश्वर मोरे, वैभव जगताप आदींना संधी दिली . तर उपनगराध्यक्ष पदी माझे सह हनिफ कुरेशी , दादासाहेब सावंत, ॲड . कमलाकर वीर, राजकुमार परदेशी, अहमद कुरेशी , रतनचंद दोशी, श्रीनिवास कांबळे, सत्यभामा बनसुडे आदींना संधी दिली . तसेच अजितसिंग परदेशी , नजीर अहमद कुरेशी, भारत जाधव, गुलाम हुसेन वस्ताद, दादाराम लोंढे, बबन पाटील, ज्ञानदेव फंड, इंदूरे, रासकर, चांदगुडे, मंडलिक, घोलप, फंड, राखुंडे,कुंभार, क्षीरसागर, ढेपे, कांबळे,बनसुडे , आवटे ,यांचे सह अनेक कार्यकर्त्यांना नगरसेवकपदी काम करणेची संधी दिली . जयवंतराव जगताप यांचे खंबीर नेतृत्त्व असले मुळे शहरात कधीही दहशत, जातीयवाद आदी बाबींना थारा मिळाला नाही व शहराचे सामाजीक स्वास्थ्य उत्तमरित्या टिकून राहिले आहे . सर्व जाती - धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत . शहरात जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली बाजार समिती चा सर्वांगीण विकास झाल्यामुळे त्याच्या सकारात्मक परिणामातून सक्षम बाजारपेठ निर्माण होवून अर्थकारणास चालणा मिळाली . शहरात सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या . माजी आ .जगताप यांनी शहरातील शेकडो युवकांना विविध संस्थांमधे नोकरीच्या संधी दिल्या . नोकरी व व्यवसायाच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना उदरनिर्वाहाची संधी दिली .त्यामुळे शहरातील प्रत्येक कुटुंबामधे जगताप यांचे विषयी कृतार्थतेची व आदराची भावना असून सर्वसामान्य जनतेचे अपार प्रेम लाभलेले जयवंतराव जगताप हे तालुक्यातील एकमेव नेतृत्त्व असल्याचे देखील माजी नगराध्यक्ष ढाळे यांनी सांगीतले .

jsjhjaja