सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा साजरा केला गेलेला योग दिन- श्री.शंभूराजे जयवंतराव जगताप (BJP)करमाळा.



*सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा साजरा केला गेलेला योग दिन-  श्री.शंभूराजे जयवंतराव जगताप (BJP)करमाळा.*
         *भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.*
       *BJP चे श्री.शंभुराजे जगताप यांच्या* *मार्गदर्शनाखाली स्वतः शंभूराजे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ह्या योग दिनाचे आयोजन केले. महात्मा गांधी विद्यालय,करमाळा येथे* *सकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारताचे पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांचा योग दिन व योगासनांचे मनुष्याच्या आयुष्यातील महत्त्व यावर बोलताना- मोठ्या डिजिटल स्क्रीनवर- व्हिडिओ स्पीच ने करण्यात आली. हा योग दिन साजरा करताना कोणत्याहीप्रकारचा राजकीय सहभाग न घेता, सामाजातील जास्तीत- जास्त लोक सहभाग घेऊन हा कार्यक्रम संपन्न झाला.*विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी योग किती महत्त्वाचा आहे याचे महत्त्व या ठिकाणी योग शिक्षकांद्वारे पटवून देण्यात आले. करमाळा शहरातील सर्व प्राथमिक शाळा, विद्यालयातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व हजारोच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. करमाळा शहरातील सरकारी पदाधिकारी, सेवा संस्थेचे सदस्य, व्यापारी वर्ग, हा योग दिन साजरा करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.यावेळी शंभूराजे जगताप यांनी स्वतः काही अवघड योगासने उपस्थित विद्यार्थ्यांसमोर करून दाखवली.योग शिक्षकांनी उपस्थित विद्यार्थ्यांना योग नियमांचे पालन करून योग आसने शिकविली.सर्व विद्यार्थ्यांनी योग आसने करत आनंद व्यक्त केला.शंभूराजेंनी आयोजित केलेल्या या भव्य -दिव्य अशा योग दिनासाठी शंभूराजेंवर करमाळा तालुक्यातील सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.*
         *योगाभ्यासाचे महत्त्व भारताच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे.भारतीय धर्म संस्कृतीमधील "योग" संकल्पनेची मांडणी श्रीमदभगवद्गीता ग्रंथात केलेली आहे. योगासनांमुळे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास तर होतोच  त्याचबरोबर याद्वारे आध्यात्मिक उन्नतीही साधता येते.बीपी पेशंटसाठी योगा त्याच्या टॅब्लेटइतकेच जीवनासाठी महत्वाचे आहे. काही आजारात पडल्यानंतर आणि नंतर त्याच्या उपचारासाठी इकडे -तिकडे धावणे आणि बराच खर्च केल्यावर आजपासून योगासाठी वेळ काढणे चांगले. यात कोणतीही किंमत नाही आणि तोटा नाही. योगाचे फक्त फायदे आहेत, जे जगातील सर्व लोकांनी ओळखले आहेत, म्हणूनच देशात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे.*
     

Comments

Popular posts from this blog

बहुजन विकास संस्थेच्या वतीने येत्या 7 ऑक्टोबर रोजी लेझर खतना कॅम्पचे आयोजन मुस्लिम बांधवांनी लाभ घेण्याचे केले आवाहन.

विकास कामे ,जनतेचा ठाम विश्वास व पाठबळामुळे नगरपालिका निवड्णुकीत जगताप गटाचा विजय निश्चित : माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे :- करमाळा( प्रतिनिधी राजु सय्यद )करमाळा शहरात गेली २५ वर्षापासून सातत्त्याने अखंडीत, सुरळीत सुरु असलेला पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य यासह कोट्यावधी रुपयांची केलेली विकासकामे शहरवासियांचा माजी आमदार जगताप यांचे नेत्तृत्वावर असलेला गाढा विश्वास, श्रद्धा व नागरीकांना दिलेल्या सोयीसुविधांमुळे येणाऱ्या नगरपरीषद निवडणुकीत जगताप गटाचा विजय निश्चित असल्याचा ठाम आत्मविश्वास माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी व्यक्त केला आहे . याविषयी अधिक माहिती देताना ढाळे यांनी सांगीतले कि,करमाळा नगर परीषद १९९५ सालापासुन मा .आ .जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली जगताप गटाच्या सलग २५ वर्ष ताब्यात आहे .' क' वर्ग नगर परीषद असताना देखील जयवंतराव जगताप यांनी अपक्ष आमदार असताना खास बाब म्हणून उजनी जलाशयावरून दहिगाव येथुन करमाळा शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर करून ती कार्यान्वित केली .२००९ मधे शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार याचा विचार करून १३ कोटीची विस्तारीत पाणी पुरवठा योजना देखील मंजूर करून कार्यान्वित केली . याचा परिणाम म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना , लातूरला रेल्वे व्दारे पाणीपुरवठा होत असताना , सोलापूर व अक्कलकोट सारख्या ठिकाणी १५ - १५ दिवस पाणी येत नव्हते परंतु करमाळा शहरात मात्र अखंडीत , स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा अव्याहतपणे सुरू होता व आहे . त्याचबरोबर शहरातील रस्ते, वीज, आरोग्य, स्वच्छता या बाबी अतिशय सुरळीत असल्यामुळे शहरवासियांची जयवंतरावांच्या नेतृत्वावर अगाढ श्रध्दा व ठाम विश्वास आहे .आगामी काळात शहरात भुयारी गटार योजनेस मंजुरी व निधीची उपलब्धता करून लवकरात लवकर ही योजना पूर्णत्वास नेण्याचा जयवंतराव जगताप यांचा मानस आहे . आमदार संजयमामा शिंदे यांचेसमवेत भुयारी गटार योजना व रस्ते निधी संदर्भात चर्चा होवून त्याचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच या योजनांना मंजूरी व निधीची उपलब्धता निश्चितपणे होणार असल्याची माहिती देखील आमदार शिंदे व माजी आमदार जगताप यांनी दिली आहे .जगताप गटाला करमाळा तालुक्यात कार्यकर्ते व नेते घडविणारी नर्सरी असे संबोधले जाते .जयवंतराव जगताप यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही . बहुसंख्य समाजासह अल्पसंख्य समाजासही त्यांनी राजकारणात न्याय दिला .करमाळा नगर परीषदेच्या नगराध्यक्षपदी त्यांनी युसूफ नालबंद, ॲड .डी.पी. जगताप, सुशीला आगलावे, शौकत नालबंद, सुनीता  वाशिंबेकर, विद्या चिवटे, पुष्पा फंड, अमोद संचेती, दिपक ओहोळ,ज्ञानेश्वर मोरे, वैभव जगताप आदींना संधी दिली . तर उपनगराध्यक्ष पदी माझे सह हनिफ कुरेशी , दादासाहेब सावंत, ॲड . कमलाकर वीर, राजकुमार परदेशी, अहमद कुरेशी , रतनचंद दोशी, श्रीनिवास कांबळे, सत्यभामा बनसुडे आदींना संधी दिली . तसेच अजितसिंग परदेशी , नजीर अहमद कुरेशी, भारत जाधव, गुलाम हुसेन वस्ताद, दादाराम लोंढे, बबन पाटील, ज्ञानदेव फंड, इंदूरे, रासकर, चांदगुडे, मंडलिक, घोलप, फंड, राखुंडे,कुंभार, क्षीरसागर, ढेपे, कांबळे,बनसुडे , आवटे ,यांचे सह अनेक कार्यकर्त्यांना नगरसेवकपदी काम करणेची संधी दिली . जयवंतराव जगताप यांचे खंबीर नेतृत्त्व असले मुळे शहरात कधीही दहशत, जातीयवाद आदी बाबींना थारा मिळाला नाही व शहराचे सामाजीक स्वास्थ्य उत्तमरित्या टिकून राहिले आहे . सर्व जाती - धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत . शहरात जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली बाजार समिती चा सर्वांगीण विकास झाल्यामुळे त्याच्या सकारात्मक परिणामातून सक्षम बाजारपेठ निर्माण होवून अर्थकारणास चालणा मिळाली . शहरात सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या . माजी आ .जगताप यांनी शहरातील शेकडो युवकांना विविध संस्थांमधे नोकरीच्या संधी दिल्या . नोकरी व व्यवसायाच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना उदरनिर्वाहाची संधी दिली .त्यामुळे शहरातील प्रत्येक कुटुंबामधे जगताप यांचे विषयी कृतार्थतेची व आदराची भावना असून सर्वसामान्य जनतेचे अपार प्रेम लाभलेले जयवंतराव जगताप हे तालुक्यातील एकमेव नेतृत्त्व असल्याचे देखील माजी नगराध्यक्ष ढाळे यांनी सांगीतले .

jsjhjaja